अखंड बाराबलुतेदार समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची व्यवस्था करा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात बहुजन समाजातील तसेच अखंड बाराबलुतेदार समाजातील विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र शालेय वसतीगृह (हॉस्टेल) उपलब्ध करण्याची मागणी शिवसेनेचे तिरोडा-गोरेगावचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दाखले यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहर शैक्षणिक क्षेञात अग्रगन्य आहे. पिपरी-चिंचवड शहरामध्ये संपूर्ण राज्यातून अखंड बाराबलुतेदार समाज बांधव नोकरी व शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थायीक आहे.
अखंड बाराबलुतेदार समाज बांधवाचे तसेच बहुजन समाज बांधवांच्या शालेय विद्यार्थ्यांकरिता अभ्यासासाठी पुरेसी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गेरसोय होत आहे. तरी आपण स्वतः गांभीर्याने दखल घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये बहुजन तसेच अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वसतीगृह उपलब्ध करून देण्यात यावे. संबंधीत समाजकल्याण विभागाला तशा सुचना द्याव्यात. येत्या २१ दिवसांत आपण तशा सुचना व लेखी उत्तर न दिल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दाखले यांनी निवेदनातून दिला आहे.