breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; दैनंदिन रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक

मुंबई |

देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख १५ हजार ७३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी ५ एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी २८ लाख १ हजार ७८५ इतकी झाली आहे. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. करोनाकाळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. दरम्यान देशातील अॅक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या ८ लाख ४३ हजार ४७३ वर पोहोचली आहे.

करोना सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय गेल्या २४ तासात ६३१ मृत्यू झाले आहेत. भारतात आतापर्यंत १ लाख ६६ हजार १७७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

वाचा- बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button