breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
Social Media : …तर मोदी भक्तांनीही ‘सोशल मीडिया’ सोडावा : नवाब मलिक
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारपासून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. काही भाजपा नेत्यांनी सुद्धा सोशल मीडियामधून बाहेर पडण्याचे सांगितले आहे. सर्व मोदी भक्तांनी देखील सोशल मीडिया सोडला पाहिजे, असे विधान राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
मोदी भक्त सोशल मीडियामधून बाहेर पडले तर या देशात नक्कीच शांतता नांदेल. मोदी यांचा निर्णय देशहिताचा आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी खोचक टीकाही मलिक यांनी केली आहे.