महाराष्ट्राने जनसामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला: जयंत पाटील
![Maharashtra has lost a warrior fighting for the masses forever: Jayant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/031478cc-aadb-4d59-8a67-dd3b460ec569.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्राने जनसामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे असे जयंत पाटील म्हणाले.
ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. महाराष्ट्राच्या विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा.एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले.एन. डी. पाटील यांच्याशी अत्यंत कौटुंबिक असे संबंध होते असे सांगतानाच जयंत पाटील यांनी एन. डी. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.