breaking-newsमुंबई
#Coronolockdown:परिस्थिती पाहून लॉकडाऊन विषयी 3 मेनंतरच निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई. लॉकडाऊन लवकर संपवून जनजीवन पूर्वपदावर कसे येईल यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. मात्र, परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनचे काय करायचे याबाबतचा निर्णय ३ मेनंतर घेतला जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊनविषयीच्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला.
रविवारी दुपारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, लाॅकडाऊनमुळे देवळे बंद असताना देव मात्र आपल्यात आहे. तो डॉक्टरांमध्ये, पोलिसांमध्ये, नर्स व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचे सांगत कोरोना योद्ध्यांना मुख्यमंत्र्यांनी देवाची उपमा दिली. तसेच, कोरोनामुळेे मृत्यू ओढवलेले पोलिस शहीद झालेले असून त्यांच्या कुटुंबीयांना सर्व मदत केली जाईल, असे वचन त्यांनी दिले.