अणुऊर्जा प्रकल्पाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात पालकवर्गाची एकजूट
पालघर |
अणुऊर्जा शाळेत शिक्षण घेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या विद्याथ्र्यांना शुल्क भरा अन्यथा पुढील वर्गात पाठवले जाणार नाही, असा फतवाच काढल्याने प्रकल्पग्रस्त पालकवर्ग यांनी लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दाद न मिळाल्याने या विरोधात ते मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तारापूरमधील अणुऊर्जा प्रकल्प उभा राहत असताना येथील विस्थापित गावांतील प्रकल्पग्रस्तांना भौतिक व मूलभूत सुविधा, शिक्षणाच्या सुविधा व रोजगार आदी बाबी देऊ अशी आश्वासने अणुऊर्जा प्रकल्पाने दिली होती.
मात्र ही आश्वासने पाळण्यात प्रकल्प काणाडोळा करीत असल्याचे आरोप हे प्रकल्पग्रस्त करीत आहेत. प्रकल्प उभा राहिल्यानंतर प्रकल्पामध्ये अणुऊर्जा शाळा सुरू झाली. मात्र सुरुवातीपासूनच या अणुऊर्जा शाळेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्रवेशासाठी धडपड व संघर्ष करावा लागत आहे. याउलट प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व इतर मुलांना या शाळेत महत्त्वाचे स्थान दिले जाते. प्रकल्प असा दुजाभाव का करीत आहे, अशी विचारणा यानिमित्ताने पालकवर्ग करीत आहे.
वाचा- धक्कादायक! करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…