20 ऑगस्टपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस
मुंबई- सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातच आता हवामान खात्याने येत्या 20 ऑगस्टपर्यंत संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींसह पाऊस कोसळत आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोकणातील वाशिष्ठी, अर्चना, गोदावरी या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी तेथील बाजारपेठेत शिरल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पावसाचा हा जोर कायम राहणार असून हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार कोकणात येत्या 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.