“सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही”-नितीन गडकरी
सध्याची मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबईत येण्याची हिंमत सहजासहजी कुणीही करणार नाही…अशाप्रकराची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही व्यक्त केलेली आहे…देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या २२४८ वर गेली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनीही मुंबईत येण्याबाबत भिती व्यक्त केली आहे…
“सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोरोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करतील याबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबईत सोमवारी एका दिवसात ३१३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रीय रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर ५० टक्के झाला आहे. मात्र दिवसभरात १०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत नवे १०६६ रुग्ण आढळून आल्यामुळे मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा ५९,२०१ वर गेला आहे. तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा २२४८ वर गेला आहे.