Breaking-newsमुंबई
शरद पवार यांच्या विरोधातील याचिका अखेर मागे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/sharad-pawar759.jpg)
मुंबई – दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांना दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला.
त्यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका सुनावणी घेण्यास योग्य नसल्याचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने स्पष्ट करून याचिका फेटाळत असल्याचे संकेत देताना याचिकाकर्त्यांनी संबंधीत विभागाकडे दाद मागावी, असे स्पष्ट केल्याने अखेर याचिकाकर्त्यांने याचिका मागे घेतली.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पवार यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना आहेत. त्यामुळे आधी गावाला आणि नंतर कामाच्या ठिकाणी असे दोनदा मतदान करा असे वक्तव्य केले होते.