मुख्यमंत्र्याच्या दाै-यातील कोकणच्या “दाखवा रे त्या बातम्या’, नारायण राणे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1-24.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दौऱ्यात कोकणाला काय मिळाले ? असा सवाल करतानाच त्यांच्या दौऱ्यातील “दाखवा रे त्या बातम्या’ असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.
ठाकरे यांच्या दौऱ्यावर आमदार नीतेश राणे यांनीही टीका करताना मुख्यमंत्री हे दोन दिवसाचे पर्यटक असल्याचे म्हटले आहे. पूत्र नीतेश यांच्यापाठोपाठ आज स्वत: नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करताना काही प्रश्नही उपस्थित केले.
परवा आणि काल उद्धव ठाकरे यांचा दौरा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होता. या दौऱ्यात कोकणाला काय मिळालं ? रत्नागिरीहून सिंधुदुर्गला आले, हेलिकॉफटरने हा प्रवास केला. रत्नागिरीत येऊनही नाणारबाबत एक शब्द बोलले नाही. पत्रकारांना भेटले नाही.
सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर आल्यावर मिनी केबिनेट होणार अस ऐकले होते. मात्र तीन जणांची मिनी केबीनेत झाली की नाही याचा संदर्भ ऐकायला मिळाला नाही. विकासात्मक मुद्दे आले त्याचा बोध नाही झाला असे राणे यांनी म्हटले आहे.