breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईत शिवसेना नंबर एक तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हवीः अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ajit-pawar-munde-Frame-copy.jpg)
मुंबई | महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.