breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईत पावसाची पुन्हा बॅटिंग; अनेक भागात मुसळधार, रेल्वे वाहतूक उशिराने
मुंबई | आठवड्याभरापासून गायब झालेल्या पावसाने बुधवारी पहाटेपासून बॅटिंग सुरू केली आहे. पाऊस गायब झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शीव-कुर्ला भागात पावसाचे प्रमाण जास्त होते. ठाणे- नवी मुंबईतही पावसाने चांगली हजेरी लावली असून रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.
पहाटेपासून संततधार पावसामुळे पूर्व महार्गावरील वाहतुकीला देखील फटका बसला आहे. शीव, कुर्ला, भांडुप. मुलुंड मध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले आहे. ठाण्यात अंबरनाथ, बदलापूर, कल्याण भागातही पाऊस चांगलाच बरसत आहे.