breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईतील लोकल सेवा आज मध्यरात्रीपासून बंद
मुंबई –
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांनी आज (दि. 22) जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनतेने घरातच राहण्याचं मोदींनी सांगितलं आहे.
तसेच , करोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी मुंबईतील लोकलसेवा दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय शासनाने घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईतली लोकल बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.