breaking-newsमुंबई

मुंबईकरांसाठी खुशखबर तानसा धरण ओसंडून वाहू लागले

मुंबई – ऐन पावसाळ्यात २० टक्के पाणीकपातीचे संकट ओढावलेल्या मुंबईकरांसाठी खूशखबर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण काल सायंकाळी ७.०५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ प्रमुख धरणांमधील ते एक असल्याने आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मंगळवारी मोडकसागर धरणही ओसंडून वाहत होते.

मुंबई शहर आणि उपनगरांना ७ मोठ्या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. ही धरणे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहेत. यंदाच्या पावसाळ्यात जुलैमध्ये मुंबईत जोरदार पाऊस झाला, तरी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मुंबईत ऐन पावसाळ्यात २० टक्के पाणीकपात पालिकेने केली आहे. असे असताना मोडकसागरपाठोपाठ तानसा भरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. ७ धरणांमधून मुंबईला दररोज ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लिटर आहे. काल सकाळपर्यंत सातही धरणांतील जलसाठा हा १२ लाख ६२ हजार ११९ दशलक्ष लिटर इतका झाला असून तो क्षमतेच्‍या ८७.२० टक्‍के एवढा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button