breaking-newsमुंबई

मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षाच!

  • कमाल तापमानात वाढ; किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक

नोव्हेंबर महिना संपत आला तरी सततच्या घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळांचे चटके मुंबईकरांना सोसावे लागत आहेत. पूर्वेकडून येणारे तीव्र वारे आणि समुद्राकडमून येणारे वारे उशिरा स्थिरावत असल्याने हवेतील आद्र्रतेचे प्रमाण वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. उत्तरेकडून वाहणारे शुष्क वारे डिसेंबरच्या मध्यानंतरच येण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

नोव्हेंबरच्या मध्यावर किमान तापमानामध्ये घट झाल्याने सकाळी हवेत गारवा होता. अगदी सरासरीपेक्षाही किमान तापमान काही अंश खाली गेल्याचे नोंदले होते. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि परिसरामध्ये असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंश से. वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत किमान तापमान २२ अंश से.पर्यंत गेल्याचे नोंदले गेले. त्यात गेल्या दोन दिवसांपासून समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे उशिरा स्थिरावत आहेत. सर्वसाधारणपणे हे वारे दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास जमिनीकडे वाहतात; परंतु ही वेळ थोडी पुढे गेल्याने आणि पूर्वेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यांमुळे हवेतील आद्र्रतेचे प्रमाण वाढले असून कमाल तापमान ३५ ते ३६ अंश से.वर गेल्याचे वेधशाळेने सांगितले.

कमाल तापमानात वाढ; किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक

नोव्हेंबर महिना संपत आला तरी सततच्या घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळांचे चटके मुंबईकरांना सोसावे लागत आहेत. पूर्वेकडून येणारे तीव्र वारे आणि समुद्राकडमून येणारे वारे उशिरा स्थिरावत असल्याने हवेतील आद्र्रतेचे प्रमाण वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. उत्तरेकडून वाहणारे शुष्क वारे डिसेंबरच्या मध्यानंतरच येण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

नोव्हेंबरच्या मध्यावर किमान तापमानामध्ये घट झाल्याने सकाळी हवेत गारवा होता. अगदी सरासरीपेक्षाही किमान तापमान काही अंश खाली गेल्याचे नोंदले होते. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि परिसरामध्ये असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंश से. वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत किमान तापमान २२ अंश से.पर्यंत गेल्याचे नोंदले गेले. त्यात गेल्या दोन दिवसांपासून समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे उशिरा स्थिरावत आहेत. सर्वसाधारणपणे हे वारे दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास जमिनीकडे वाहतात; परंतु ही वेळ थोडी पुढे गेल्याने आणि पूर्वेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यांमुळे हवेतील आद्र्रतेचे प्रमाण वाढले असून कमाल तापमान ३५ ते ३६ अंश से.वर गेल्याचे वेधशाळेने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button