breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महाराष्ट्राला लॉकडाऊनचा ‘असा’ही फायदा

दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या लॉकडाऊनचे जसे नुकसान झाले तसे या लॉकडाऊनचा काही फायदेही झाले आहेत…यातला एक फायदा असा झाला की मुंबईतील प्रदूषणात ८०% टक्के घट झाल्याचं दिसून आलं. एअर क्वालिटी इंडेक्समध्ये गेल्या आठवडाभरात मुंबईतील हवेचा दर्जा समाधानकारक असल्याचं दिसून आलं. मात्र आता संशोधकांनी यावर अधिक संशोधन केलं. 

दिल्लीतील विज्ञान आणि पर्यावर  केंद्रानं मुंबई आणि नवी मुंबईतील हवेचा दर्जा  दर एक तासानं तपासला.  यावून असं  लक्षात आलं की लॉकडाऊन दरम्यान हवेतील प्रदूषणास कारणीभूत असलेल्या घटकांपैकी नायट्रोजनचं प्रमाण हे ८५% ने घसरले. तर जनता कर्फ्यु दिवशी मुंबईतील नायट्रोजनचे प्रमाण हे ८३% नं कमी होते. गेल्या काही दिवसांत रस्त्यावर खूप कमी वाहाने होती तसेच बांधकाम आणि  इतर उद्योगधंदेही बंद असल्यानं हवेचा दर्जा सुधारत असल्याचं  समोर आलं. 

मुंबईबरोबरच नवी मुंबईतीलही हवेचा दर्जा सुधारताना दिसत आहे. मुंबईच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी असते, पीक हवर्स म्हणजे कामाच्या वेळी ही कोंडी अधिकच पहायला मिळते. मात्र लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी खूपच कमी झाली आहे आणि याचाच फायदा प्रदूषण कमी होण्यास झाला असं विज्ञान आणि पर्यावर  केंद्राच्या संशोधन विभागाच्या संचालिका अनुमिता रॉय चौधरी म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button