breaking-newsमुंबईराष्ट्रिय

‘महात्मा गांधींना ठार मारणारे हेच देशद्रोही’, काँग्रेस मंत्र्याचा टोला

मुंबई | महाईन्यूज

ठाकरे सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून यामध्ये काँग्रेसच्या 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनीही मंत्री आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. मात्र, अस्लम शेख यांच्या शपथविधीवरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. आता, मंत्री अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेला थेट दिल्लीतून उत्तर दिल आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा नेत्यांनाच देशद्रोही म्हटलेल आहे.

भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत, उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणत अस्लम शेख यांच्या मंत्रीपदावरुन टोला लगावला. ‘देशद्रोही आता देशभक्त झाले… उद्धवा, अजब तुझे सरकार’ असं सोमय्यांनी म्हटलं आहे.अस्लम शेख यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसह दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलेले आहे.

महात्मा गांधींना ठार मारणारे हेच देशद्रोही आहेत, असे म्हणत किरीट सोमैय्यांच्या टीकेला अस्लम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, मला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने यांच्या पोटात दु:खत आहे. हे महात्मा गांधींना ठार मारणारे लोकं आहेत, हेच नथुराम गोडसेंचं मंदिर उभारणारे भाजपावाले आहेत, असे म्हणत अस्लम शेख यांनी किरीट सोमैय्यांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button