breaking-newsमुंबई

भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यामुळे भारातमधील विश्वचषकाचा मार्ग मोकळा झाला होता. पण आता ऑस्ट्रेलियातील विश्वचषक नेमका कधी होणार, याबाबत उत्सुकता आहे.

आगामी विश्वचषक भारतात खेळवायचा की ऑस्ट्रेलियाला यजमानपद द्यायचे, हा मोठा प्रश्न आयसीसीपुढे पडला होता. पण आता भारतातील विश्वचषक हा पहिल्यांदा म्हणजेच २०२१ साली होणार आहे. त्यानंतर २०२२ साली ऑस्ट्रेलियामधील विश्वचषक खेळवला जाईल, असे आयसीसीने यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सलग तीन वर्षांमध्ये तीन विश्वचषक पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे.

भारतातील ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२१ साली खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर २०२२ साली ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवला जाईल. त्यानंतर भारतामध्ये २०२३ साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतामध्ये होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button