breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन महोत्सव
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोकणातील पर्यटन वाढीसाठी युवासेना प्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन महोत्सव भरवले जाणार आहेत. यात सिंधुदुर्गात होणारा “सिंधू बीच महोत्सव” मालवणच्या किनारपट्टीवर घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री उदय सामंत यांनी मालवणात आयोजित सत्कार सोहळ्यात दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांचे रविवारी सायंकाळी मालवण येथील शिवसेना कार्यालयात आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने ढोलताशांच्या गजरात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.