breaking-newsमुंबई
कोरोनाकाळात आर्थिक नुकसान झाल्यामुळे मेट्रो प्रकल्पातील भागीदारी रिलायन्स विकण्याच्या तयारीत
मुंबई – मुंबईत धावणाऱ्या मेट्रोची मालकी असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच रिलायन्स उद्योग समूहाने मुंबई मेट्रोमधील भागीदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र रिलायन्स उद्योग समूहाने केंद्र सरकारला लिहिलेले आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपली भागीदारी विकणार आहे.
कोरोना महामारीच्या गेल्या 5 महिन्यांच्या काळात मुंबई मेट्रोचे सर्व व्यवहार बंद आहेत. या पाच महिन्यांच्या काळामध्ये मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. पूर्वीपासूनच ही मेट्रो कंपनी तोट्यात चालली होती. मात्र कोरोनाने या कंपनीचे कंबरडे मोडले आहे आणि हा पांढरा हत्ती पोसणे त्यांच्या कुवतीच्या पलीकडचे आहे. म्हणूनच त्यांनी मुंबई मेट्रोमधील भागीदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे.