breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ऑगस्टमधील दमदार पावसामुळे मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर

ऑगस्टमधील दमदार पावसामुळे मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव काठोकाठ भरले असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १४ लाख १९ हजार, म्हणजे ९८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. ऑगस्टमधील दमदार पावसामुळे मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव काठोकाठ भरले असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १४ लाख १९ हजार, म्हणजे ९८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील वर्षभर पाण्याची समस्या उद्भवणार नाही.

यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै कोरडे गेल्याने मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले होते. टंचाईमुळे २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने टंचाई दूर होण्याचे संकेत मिळू लागले होते. १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या सर्व सात तलावांमध्ये जुलै अखेरपर्यंत जेमतेम चार लाख दशलक्ष लिटर इतकेच पाणी शिल्लक राहिले होते. त्यामुळे पालिकेला संपूर्ण मुंबईत पाणीकपात करावी लागली होती.

ऑगस्टमध्ये २० ते २५ दिवस जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे सर्व तलाव काठोकाठ भरले आहेत. मुंबईला दररोज सर्वाधिक, म्हणजे एक हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा भातसा तलावही शनिवारी ९८ टक्के भरला आहे. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी हे चार तलाव गेल्या महिन्यातच ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने टप्प्याटप्प्याने पाणी कपात रद्द केली. पालिकेने पाच सप्टेंबरला पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता, तलावांत १४ लाखांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा येणारे वर्षभर पुरेल इतका आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नाही, असे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button