breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

इंडिया आघाडीला मोठा धक्का! ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकट्याने लोकसभेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपावरुन काँग्रेस आणि टीएमसीमध्ये एकमत झालं नाही. त्यामुळे त्यांनी एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझी काँग्रेस पक्षाशी कुठल्याही प्रकारे चर्चा झाली नाही. पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आलोय. आमची एक धर्मनिरपेक्ष पार्टी आहे. आम्ही स्वबळावर भाजपाला हरवू शकतो. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण त्या बद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं नाही.

हेही वाचा    –    राहिले अवघे काही दिवस! FASTag केवायसी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करा अन्यथा..

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने तृणमूल काँग्रेससकडे १० ते १२ जागांची मागणी केली होती. पण, तृणमूलने काँग्रेसला फक्त २ जागा दिल्या होता. यानंतर पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती. ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. ममता बॅनर्जी ज्या दोन जागा सोडण्यास तयार आहे, तिथे काँग्रेसने भाजपा आणि तृणमूलचा पराभव केला आहे. निवडणूक कशी लढवायची, हे काँग्रेसला माहिती आहे, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button