breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यासाठी पुढचे ४ दिवस पावसाचे, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : देशासह राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे आहेत. नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी आणि बुधवारच्या मध्यरात्री पावसाने नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही भागांना झोडपले.

हवामान विभागाने दोन दिवसांआघीच मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला होता. पश्‍चिमेकडे निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), जळगाव (Jalgaon), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), पालघर (Palghar), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), यवतमाळ (Yavatmal), अहमदनगर (Ahmednagar) या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणात २९ मेपर्यंत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रा आणि विदर्भात आज कोरडे हवामान असून २९ मेपर्यंत ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button