राज्यात आज मुसळधार पाऊस, ‘या’ ६ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’
पुणे : राज्यात मागील २-३ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कोसळत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अशातच राज्यातील काही ठिकाणी शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागच्या अंदाजानुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सातारा येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा – ‘४० आमदारांचा निकाल लावायला ४० तास..’; संजय राऊतांचं मोठं विधान
राज्यात सक्रीय झालेला पाऊस पुढील २-३ आठवडे कायम राहिल असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील रबी पिकाला नवी संजिवनी मिळाली आहे. तसेच यामुळे रबी हंगाम वाया जाण्याचा धोका टळू शकतो.