हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Untitled-design-4-6-780x470.jpg)
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर येथे आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला. आगीत भाजल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला. कारखान्याला आग लागल्यानंतर त्यात लोक अडकल्याची माहिती मिळाली.परिसरातील नागरिकांनी कारखान्यात अडकलेल्या आपल्या नातेवाईकांना वाचवण्याची विनवणी सुरू केली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदतकार्य सुरू केले. आग आता आटोक्यात आली आहे. या कारखान्यात लागलेल्या आगीत पाच जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली. स्थानिकांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी नगर येथील वालज एमआयडीसी भागातील रिअल सनशाईन कंपनीला भीषण आग लागली असून पाच कर्मचारी आत अडकले आहेत.त्याचवेळी पोलिसांनी ६ जण भाजल्याचे वृत्त दिले आहे. जखमींना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन ते तीन गाड्यांना मोठी कसरत करावी लागली. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते.सध्या आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.ही कंपनी कॉटन हॅण्डग्लोव्हज बनवते असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – ‘गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास कटिबद्ध’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आगीच्या घटनेनंतर लगेचच कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, पाच कर्मचारी इमारतीत अडकले आहेत. भुल्ला शेख (६५), कौसर शेख (२६), इक्बाल शेख (२६) आणि मगरूफ शेख (२५) अशी अडकलेल्या चार कामगारांची स्थानिकांनी ओळख पटवली आहे. कामगारांनी सांगितले की, कंपनी रात्री बंद होती आणि आग लागली तेव्हा ते झोपले होते. ‘आग लागली तेव्हा इमारतीत १०-१५ लोक होते. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, पण काही अजूनही आत अडकले होते’; असे त्यांनी सागितले.