‘..मग आपण हिंदू ४-५ मुलं जन्माला घालू शकत नाहीत का?’ देवकीनंदन महाराजांचं विधान चर्चेत
हिंदूंनी ४-५ मुलं जन्माला घालावीत, माझे ४ मुलं आहेत
![Devkinandan Maharaj said that Hindus should give birth to 4-5 children](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Devkinandan-Maharaj-780x470.jpg)
Devkinandan Maharaj : कथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज आपल्या विधानावरून कायम चर्चेत असतात. दरम्यान त्यांना एका विधानाची चर्चा चांगलीच सुरू आहे. हिंदूंनी ४-५ मुलं जन्माला घालावीत, माझे ४ मुलं आहेत, असं विधान महाराज देवकीनंदन यांनी केलं आहे. हे विधान वादग्रस्त असल्याने टीकाही होत आहे.
देवकीनंदन महाराज म्हणाले की, अल्पसंख्याक हे ४०-४० मुलं जन्माला घालू शकतात, मग आपण हिंदू ४-५ मुलं जन्माला घालू शकत नाहीत का? माझे स्वत:चे ४ मुलं आहेत, त्यामुळे मी हिंदूंना ५-५ मुलं जन्माला घालण्याचे बोलतोय. जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायदा होत नाही, तोपर्यंत बहुसंख्य राहाल असे कार्य करा.
सनातनी हेच बहुसंख्य असायला हवेत, अन्यथा हा देश सेक्युलर राहणार नाही. ते म्हणतात आम्ही ६० कोटी झाल्यानंतर हा देश आमचा होईल, आत्ता ते ३० कोटी आहेत, तरीही तशी भाषा करतात. युट्यूबवर याबाबतचे व्हिडिओ पाहायला मिळतील. हे आत्ताच असं बोलत असतील, मग पुढे काय होईल?, असं कथावाचक देवकीनंदन महाराज म्हणाले.
दरम्यान, इतिहासाच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याचा अभ्यासक्रम हटवला आहे, पण येथील रस्त्यावरूनही त्यांची नावे हटवायला हवीत. या देशात प्रभू राम-कृष्ण हे महान होते आणि राम-कृष्ण हेच महान राहतील, असंही देवकीनंदन महाराज यांनी म्हटलं आहे.