breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: बाजारांमध्ये गर्दी दिसता कामा नये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Uddhav-222222.jpg)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, विलगीकरणाचे पालन झालेच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारांत आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी २४ तास दुकाने उघडी ठेवली आहेत मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत असे दिसते. भाजी बाजारांमध्येही सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या असंही त्यांनी स्पष्ट केलं.