breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अकोल्यात कोरोनामुळे ४.५१ टक्के मृत्यू
अकोल्यात करोनामुळे मृत्यू होण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४० जणांचे मृत्यू झाले आहेत. एक आत्महत्या वगळता करोनामुळे ३९ जणांचे बळी गेले. जिल्ह्यात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण ४.५१ टक्के आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत अकोल्यातील मृत्यूचे प्रमाण जवळपास एक टक्क्याने अधिक आहे.