breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Maharashtra News Today: छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये पोलीस आणि नागरिकांदरम्यान मोठा राडा झाल्याची बातमी समोर येतेय.

अतिक्रमण तोडण्यासाठी  पोलिसांसह महापालिकेचं पथक या ठिकाणी गेले असता नागरिकांनी पथकावर दगडफेक केली. नागरिक आक्रमक झाल्याचे पाहताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जनतेला पिटाळून लावलं व परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा – HSC Exam | बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर शिक्षकांचा बहिष्कार

पोलिसांचे पथक व महापालिकेचे कर्मचारी सकाळीच अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले होते. स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महिला मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या होत्या तसंच, जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button