राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
पुणे | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस हजेरी लावत आहे. मात्र अशातच आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बारसण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो.
राज्यातील पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या १० जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा – भारतीय फुटबॉलचा कोहिनूर सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा!
याशिवाय हवामान विभाच्या अंदाजानुसार मुंबईत उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस घामाच्या धारा लागणार, हे निश्चित आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून १९ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर ३१ मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून ७ ते १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.