Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यसभेवेळी उणिवा राहिल्यानं भाजपचं फावलं, निकालानंतर परिषदेचा कोटा किती आहे कळेलच : भास्कर जाधव

मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मतदान प्रक्रिया संपत आल्याचं म्हटलं आहे. शिवसेना गटा गटानं मतदान करत आहे ही गोष्ट खरी आहे. गेल्या वेळी काही उणिवा राहिल्या त्यामुळं भाजपचं फावलं आणि त्यांचा निवडून न येणारा उमेदवार निवडून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत. विधानपरिषदेसाठी मतदानाचा कोटा सांगण्यापेक्षा चार तास राहिले आहेत. मतमोजणीत मतांचा कोटा किती आहे ते कळेल,असं भास्कर जाधव म्हणाले.

  • भास्कर जाधव काय म्हणाले?
विधानपरिषदेसाठी सर्व मतदान तासाभरात झालेलं असेल. आता आम्ही विधानपरिषदेसाठी काळजी घेत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आलं आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. भाजपचा पोकळ आत्मविश्वास आहे. बाहेर संभ्रम निर्माण करायचा, वातावरण निर्माण करायचा, हवा निर्माण करायची भाजपची कार्यपद्धती आहे. चार तासानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट होईल, असं भास्कर जाधव म्हणाले.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button