‘औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी भ्रष्ट केल्या’; भालचंद्र नेमाडे यांचं विधान चर्चेत
![Bhalchandra Nemade said that Aurangzeb's two queens were corrupted by the Pandyas of Kashi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Bhalchandra-Nemade-780x470.jpg)
मुंबई : काशीच्या पंड्यांनी औरंगजेबाच्या दोन राण्या भ्रष्ट केल्या म्हणून ज्ञानवापीची मोडतोड झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य सेनापती मुसलमान होता, तर औरंगजेबाचा मुख्य सेनापती हिंदू होता, असं विधान भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. त्यानंतर आता हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
भालचंद्र नेमाडे नेमकं काय म्हणाले?
मी ज्यावेळी पुस्तकं वाचली, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, दुसऱ्या बाजीराव बाबत जी माहिती सांगितली जात आहे, ती चुकीची आहे. त्याने पेशवाई पेशव्यांच्या तावडीतून सोडवून इंग्रजांच्या ताब्यात दिली हे चांगले झाले. कारण पेशवे क्रूर होते, पण इंग्रज त्यांच्यापेक्षा कमी क्रूर होते. औंरगजेबाचा दोन राण्या होत्या. त्या काशीविश्वेश्वराला गेल्या होत्या. त्यावेळी तिथं असलेल्या पंड्यांनी राण्यांना भ्रष्ट केले. त्यानंतर तिथे जी मोडतोड औरंगजेबाने केली त्याला ज्ञानव्यापी म्हणून आता ओळखल जाते. शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान होता, औरंगजेबाचा मुख्य सरदार जयसिंग हिंदू होता.
हेही वाचा – ‘माझ्या वडिलांनी कोणाला फसवलेलं नाही’; नितीन दासाईंच्या मुलीची प्रतिक्रिया
औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते. सती प्रथा बंद करणारा पहिला औरंगजेब होता. सध्या रोज बातम्या येतात, बायका भ्रष्ट केल्याच्या. ३००-३५० लहान मुली पळवून नेल्या. सध्या इथे राहायचं कसं? हा प्रश्न आहे. सध्या बाहेर जे चाललंय ते सगळं खोटं चाललंय त्यामुळे तरुणांनी पुस्तकं वाचून खरे काय ते समजून घ्यावे तुम्ही ग्रंथ पुस्तके वाचली तर तुम्हाला सत्य समजेल, म्हणून ते वाचायला हवे. कुणाचे काही ऐकू नका, तर वाचा. तुम्ही पुस्तके वाचली की कोण खरे बोलते? कोण खोटे बोलते? हे कळते, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.