राज्यात गेल्या 24 तासात 15 हजार 196 नवे कोरोना रुग्ण
मुंबई – राज्यात गेल्या 24 तासात 15 हजार 196 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसतेय.
राज्यात बुधवारी 285 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात 15,169 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आता एकूण 2,16,016 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,76,184 झालीय.
राज्यात आज 29,270 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 54,60,589 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.