breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
हतनूर धरणाच्या 12 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/hatnur_dam.png)
भुसावळ – हतनूर धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत. मध्यप्रदेश विदर्भात झालेल्या पावसामुळे या धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून बारा दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग या धरणातून सुरू आहे.
हतनूर धरणाच्या 12 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विदर्भ व मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे धरण्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या धरणाचे पाणी संपुष्टात आले होते. त्यामुळे अनेक तालुक्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. आता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने भुसावळ-यावल त्यासारख्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.