सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल! – खासदार डाॅ.अमोल कोल्हे
पुणे |महाईन्यूज|
एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. परंतु, ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे, पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल! – असं खणखणीत इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे.
खासदार कोल्हे यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही परंतु ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल!
छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे! ते एकमेवाद्वितीय आहेत…. कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही.. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे…याचं भान ठेवा …नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल!