breaking-newsमहाराष्ट्र

संघर्ष पर्वाचा अस्त! डॉ. द्वारकादासजी लोहिया काळाच्या पडद्याआड

अंबाजोगाई येथील ज्येष्ठ समाजसेवक, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (वय ८१) यांचे शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील बारा दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी दोन वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया,मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे. राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनांमध्ये राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती.

मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचविले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचितांना आधार दिला. गरिब व निराधारांचाही ते आधार होते. बचतगटाच्या चळवळीतून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून गरीब महिलांना त्यांच्या घरपोच कर्ज उपलब्ध करून दिले. अनेक महिला आज आत्मनिर्भर झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button