विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, मुनगंटीवारांचा इशारा
मुंबई – विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळांचा कालावधी 30 एप्रिल 2020 ला संपला आहे. या महामंडळाचा कार्यकाळ वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली.विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे महामंडळ गरजेचं आहे. त्यामुळे सरकारनं ऐकलं नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराच मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
राज्य सरकार 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपालांशी खुला संघर्ष करत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विभागांचा असमतोल विकास करायचा आणि तिजोरीवर डाका टाकायचा, सरकारमध्ये सध्या हेच सुरु असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केलाय. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. इतकच नाही तर विधानसभेत याबाबत हक्कभंग आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरुनही सरकारवर निशाणा
हा कोरोना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वेगाने रंग बदलतोय, अशी मिश्किल टिप्पणी मुनगंटीवारांनी केलीय. प्रदेशाध्यक्षांनी मिरवणूक असेल तर कोरोना नाही. मात्र अधिवेशन असेल तर कोरोना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी कोरोना आहे. अधिवेशनाची वेळ आली की सरकारमधील मंत्री लगेच कोरोना वाढतो आहे, असं सांगतात आणि लॉकडाऊनची भाषा करु लागतात, असा जोरदार टोलाही मुनगंटीवार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि मंत्र्यांना लगावला आहे.