‘वन व्हर्सेस आॅल’ची तयारी ठेवा- मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/devendra-fadnavis-.jpg)
मुंबई : भाजपाच्या विरोधात सगळे पक्ष एकवटण्याची तयारी दिल्लीपासून गल्लीपर्यंत करीत आहेत. तेव्हा ‘वन व्हर्सेस आॅल’अशा लढाईची तयारी ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
शिवसेनेला सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू पण ते झाले नाही तर स्वबळावर निवडणूक लढावी लागेल. त्यासाठी सज्ज राहा. शिवसेनेशिवायही आपण जिंकू शकतो हे पालघरने दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध एक समज निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहेत. मात्र, ती वास्तविकता नाही. गेल्या चार वर्षांत आम्ही जनतेसाठी प्रचंड कामे केली ती घेऊन पुन्हा जनतेत जा. ११ ठिकाणी पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला तर त्याचीच चर्चा अधिक होते पण भाजपाने गेल्या काही वर्षांत ११ राज्ये जिंकली हे आम्हाला आत्मविश्वासाने सांगता आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.