breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

‘वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा’, मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका

जालना – मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपासून वडेट्टीवारांनी ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

वाचा :-अजित पवार पेट्रोल पंपात भेसळ करतो अशी बोंब व्हायची: उपमुख्यमंत्री

जालना येथील का कार्यक्रमात राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी न्यायमूर्ती एम जी गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस आहे असा उल्लेख केल्याचा आरोप करीत घटनात्मक अधिकार नाकारून बोगस म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी मराठी क्रांती मोर्चाने केली आहे.राजीनाम्याच्या मागणीसाठी राठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.दरम्यान, विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये जालन्यात ओबीसी समाजाचा महामोर्चा पार पडला. यावेळी वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, अशी मागणी उचलून धरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button