breaking-newsमहाराष्ट्र

राज्यात लॉकडाऊनच्या काळात ४९९ सायबर गुन्ह्यांची नोंद

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार आणि समाजकंटकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली. राज्यात सायबर संदर्भात ४९९ गुन्हे दाखल झाले असून २६१ व्यक्तींना अटक केली. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४९९ गुन्ह्यांची २३ जुन २०२० पर्यंत नोंद झाली.

  • जिल्ह्यानुसार गुन्ह्यांची नोंद

बीड ५२, पुणे ग्रामीण ४३, जळगाव ३४, मुंबई २९, नाशिक ग्रामीण १८, कोल्हापूर १७, सांगली १५, ठाणे शहर १५, बुलढाणा १५ , सातारा १४, जालना १३, नाशिक शहर १३, ठाणे ग्रामीण १३, नवी मुंबई १३, अहमदनगर १३, नांदेड १३, पालघर ११, लातूर ११,नागपूर शहर ११, परभणी ९, सिंधुदुर्ग ८, हिंगोली ८, अमरावती ८, पुणे शहर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, रत्नागिरी ४, सोलापूर शहर ४ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Tiktok विडिओ शेअर प्रकरणी २७ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube)गैरवापर केल्या प्रकरणी ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत २६१ आरोपींना अटक झाली असून यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button