breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबईत ७९२, पुण्यात ४८८ नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेटही वाढतोय
मुंबई – शुक्रवारी ११ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार ३४२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३५ % एवढे झाले आहे.
शुक्रवारी राज्यात ५,०२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात १६१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख १८ हजार ५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१०,३१४ (१८.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,५९,४९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८,८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.