breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे ; बॅनर झळकले

मुंबई: मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. या विजयानंतर शिवसेनेनं सत्तेत समसमान वाटा पाहिजे, अशी भूमिका घेतली असतानाच, आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदित्य यांच्या विजयानंतर त्यांच्या वरळी मतदारसंघात त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले असून, ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे. त्यामुळं आता सत्तेत समान वाटा दिला तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या रुपानं ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीसारख्या सुरक्षित मतदारसंघातून शिवसेनेनं त्यांना आखाड्यात उतरवलं होतं. आदित्य निवडणूक लढवत असल्यानं ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती. आदित्य ठाकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुरेश माने निवडणूक लढवत होते. ही निवडणूक आदित्य ठाकरे सहज जिंकतील. मात्र, किती मतांच्या फरकानं त्यांना विजय मिळणार याची उत्सुकता होती. त्यात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मैदानात उतरल्यानं उत्सुकता आणखी ताणली गेली होती. वरळी मतदारसंघाचा अपेक्षित निकाल लागला. आदित्य ठाकरे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असून, त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माने यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर पहिलीच निवडणूक जिंकल्याचा आनंद आदित्य यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. मला फक्त काम करण्याची संधी हवी होती. ती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्तेत समान वाटा हवा असल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यानुसार भाजप-शिवसेना महायुतीत ठरल्याप्रमाणेच सगळं होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे. त्यामुळं आता शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद दिलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button