भाजपच्या लोकांनी खोट्या गोष्टी पसरवू नये: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200519_125204.jpg)
मुंबई| महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संकटाचा अवघा महाराष्ट्र एकजुटीने सामना करतो आहे, अशावेळी माझी BJP Maharashtra भाजपच्या नेत्यांना विनंती आहे, आपण खोट्या गोष्टी पसरवू नका! मला माहित आहे, खोटे बोलण्याची आपली जुनीच सवय आहे, मात्र निदान या काळात तरी आपण खोटे बोलण्याला आवर घालावा, असे आवाहन महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.कॉरंटाईनची सोयीसुवीधा असतील,रूग्णालय असतील,पेशंटची गैरसोय होत आहे लॉकडाऊन ४ सुरू झाले पण राज्य सरकारकडे अजूनही काही ठोस पाऊलं उचलताना दिसत नाही व नियोजनाचा अभाव जाणवत असल्यामुळे सामान्य जनता व कोरोना वॉरियर्स सुद्धा त्रस्त झाले आहे, अशा आशयाचा व्हिडीओ भाजपच्या समर्थकांकडून सध्या व्हायरल होत आहे. यावर महसूल मंत्री थोरात यांनी भाजप नेत्यांना आवाहन केले आहे.