बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ
- पंतप्रधान पीक विमा योजनेत 31 जुलै पर्यत अर्ज भरता येणार
मुंबई – पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने बिगर कर्जदार शेतकर्यांना विम्याचे अर्ज भरण्यसाठी सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना येत्या 31 जुलैपर्यंत पीक विम्याचे अर्ज भरता येतील. याआधीच्या निर्णयानुसार अर्ज भरण्याची मुदत उद्या (24 जुलै) संपत होती.
सरकराने राज्यातील 34 जिल्ह्यांसाठी विमा कंपन्या नियुक्त केल्या आहेत. त्यानुसार ठाणे, रत्नागिरी, यवतमाव, औरंगाबाद, धुवे, गोंदिया, परभणी, अमरावती, भंडारा, पुणे, नांदेड, हिंगोला, वर्धा या जिल्ह्यासाठी इपाको-टोकियो, बीड, सांगली, नाशिक, रायगड, उस्मानाबाद, जवगाव, सोलापूर, सातारासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स तर जालना, वाशिम, नागपूर, गडचिरोली, पालघर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, नंदूरबारसाठी आयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी नेमण्यात आली आहे.
पीक विमा योजनेतील पिके
पंतप्रधान पीक विमा योजनेत 15 पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीव, सूर्यफूल, कापूस, खरीप कांदा आदींचा समावेश आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यावेत, अशी मागणी पुढे आली होती. परंतु, सरकारने तांत्रिक अडचणींचा विचार करून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी सात दिवसांची मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला. तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी याआधीची 31 जुलै ही मुदत कायम आहे.