breaking-newsमहाराष्ट्र
नामदेवशास्त्रींचा पंकजा मुंडेंवर आरोप ; भगवान गडावरील शांतता भंग करण्याचा प्रयत्न
बीड– नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना भगवान गडावरील शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दसरा मेळाव्या दरम्यान ज्या राजकीय शक्तींना गळावर कार्यक्रम घेण्यास विरोध झाला होता. त्याच राजकीय शक्ती वंजारा समाज आरक्षणाच्या निमित्ताने भगवानगडावरील शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात आहेत.
भगवानसेनेचे नेते फुलचंद कराड यांनी आरक्षणासाठी गडावर बैठक आयोजित केली आहे. मात्र या बैठकीला नामदेव शास्त्री यांनी विरोध केला आहे