‘तुर्तास चौकशीची गरज नाही’, पवार प्रकरणात ED बॅकफूटवर?
मुंबई – ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. ईडी प्रकरणात नाव आल्यामुळे आता नोटीस आलेली नसताना शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. मात्र आता ईडीने पत्र पाठवत तुम्हाला तुर्तास चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी बॅकफूटवर गेली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याच्या बातम्या समोर आल्या. ईडीनेही हे वृत्त फेटाळलं नाही. ज्या बँकेचे शरद पवार कधीही संचालक नव्हते, त्या बँकेतील घोटाळ्याबाबत त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला, असं म्हणत राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ईडी जरी म्हणत असेल चौकशीची आताच गरज नाही तरीही शरद पवार ईडी कार्यालयात जाऊन या प्रकरणाबाबत माहिती घेतील, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.