breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले, तर भाजपला एवढा राग का आला ? जयंत पाटील

मुंबई |महाईन्यूज|

आयुष्यातील दैवताचा उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले, शाहू महाराजांचे नाव घेतले, महात्मा फुलेंचे नाव घेतले, या महात्म्यांचे नाव घेताना, समोर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या लोकांना का राग आला? या सर्वांच्या मनात महापुरुषांच्या मनात असूया का आहे? आज नाही तर पिढ्यानपिढ्या यांच्या मनात असूया आहे. तो राग त्यांच्यामधून बाहेर आला, याचंच आम्हाला दु:ख वाटतंय, असं जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ठाकरे सरकारने आज अखेर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. त्याला जयंत पाटील, नवाब मलिक आणि सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर शिरगणती घेण्यात आली. त्यात विश्वासदर्शक ठरावांच्या बाजूने 169 मतदान झाले.

यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीवेळी महापुरुषांचे नाव घेतल्यावरुन आक्षेप नोंदवला. त्यावर राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी शिस्त पाळायला हवी होती, उद्धव ठाकरे आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात पाय ठेवत होते, त्यांचे स्वागत करणे अपेक्षित होते. परंतू त्यांनी तसं केले नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button