आम्ही सत्तेत येणार नाही, याची खात्री होती, म्हणून जनतेला दिली मोठ-मोठी आश्वासने- गडकरी
मुंबई: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक वक्तव्य केले आहे. “आम्ही सत्तेत कधीच येणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्हाला मोठी मोठी आश्वासने देण्याचा सल्ला दिला होता.” गडकरींच्या या विधानामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. विरोधकांनीही भाजपची खिल्ली उडवणे सुरु केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर गडकरींची मुलाखत ट्विट केली आहे. ते म्हणाले “तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. जनताही आता असाच विचार करत आहे. की भाजपने त्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाचा वापर पक्षाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला.
कसे घ्यावे लागतात राजकारणात निर्णय… काय असू शकतात निर्णय चुकण्याचे परिणाम? ऐका आपल्या अस्सल पाहुण्यांकडून.
पाहा #AssalPahuneIrsalNamune गुरू-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.@nanagpatekar@nitin_gadkari pic.twitter.com/HcSumtFazc— Colors Marathi (@ColorsMarathi) September 30, 2018
सही फ़रमाया, जनता भी यही सोचती है कि सरकार ने लोगों के सपनों और उनके भरोसे को अपने लोभ का शिकार बनाया है| pic.twitter.com/zhlKTrKHgU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2018