आदित्य संवाद’ पाठोपाठ आदित्य ठाकरेंचा ‘डेव्हलपमेंट डायलॉग’ हा अभिनव उपक्रम
![Environment Minister Aditya Thackeray to visit Kolhapur on Monday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images_1582624904011_aaditya_thackeray.jpg)
औरंगाबाद – पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी ‘आदित्य संवाद’ हा महाराष्ट्रातील युवा वर्गाला जोडणारा एक नावीन्यपूर्ण असा संवादात्मक उप्रकम केला होता. शिवसेना सत्तेत आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आता ‘डेव्हलपमेंट डायलॉग’
वाचा :-औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध का?- खासदार संजय राऊत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी आदित्य संवाद नावाचा कार्यक्रम घेऊन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागांतील युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात शहराच्या विकासाविषयी, तसेच विकासकामांविषयीच्या युवकांच्या मनातील त्यांच्या संकल्पना आदित्य ठाकरे यांनी जाणून घेणार आहेत. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला होता.
वाचा :-धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन
‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष संवाद आणि भेटीगाठींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक वर्गाच्या आशा आकांक्षा जाणून घेतल्या होत्या. युवा वर्गाशी निगडीत सामाजिक चर्चांना योग्य तो आकार देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आदित्य ठाकरे यांच्या या कार्यक्रमाचा उद्देश होता. विधानसभा निवडणुकीनंतर आणि शिवसेना सत्तेत आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी याच धाटणीचा डेव्हलपमेंट डायलॉग नावाचा कार्यक्रम घेत आहेत. आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील रामा हॉटेलमध्ये शहरातील मान्यवर व्यक्तींना एकत्र करून, त्यांच्या शहराच्या विकासा विषयीच्या संकल्पना जाणून घेतल्या. क्रीडा, साहित्य, इतिहास, उद्योग, पर्यटन, शिक्षण यांसह अन्य विषयांचे अभ्यासक या कार्यक्रमाला उपस्थित होते.