अमरावती विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय
अमरावती – कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रखडल्या होत्या. तर १ ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू देखील होणार होते त्याचे वेळापत्रक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जाहीर सुद्धा केले होते. मात्र गेल्या १५ दिवसापासून विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यासाठी लेखणी बंद आंदोलन पुकारले असल्याने अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पत्र काढलं या परीक्षेला तात्पुरती स्थगिती दिली.
अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाच जिल्ह्यातील ७० हजार विद्यार्थ्यांना करावी आता पुन्हा परीक्षेची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुन्हा हिरमोड झाला असून यावर्षीच शैक्षणिक सत्र धोक्यात जाणार की काय अशी चिंता विद्यार्थ्यांना आता सतावत आहे.
कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे परीक्षाच रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असावी कारण कर्मचारीनी आंदोलन केल्याने परीक्षा विभागाचे कामकाज ठप्प झाले होते.
त्यामुळे परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असतांना परीक्षेचे काम न झाल्याने परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला तर आता केव्हा विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील व केव्हा निकाल जाहीर होतील हा प्रश्न उपस्थित झाला आहे.